शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

आठ हजार कुटुंबांना हक्काचा निवारा; उंबरा ओलांडताच अनेकांना अश्रू अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:03 IST

सातारा : आयुष्यात प्रत्येकाला आपलं स्वत:चं हक्काच घर असावं, असं वाटतं. मात्र, ही अपेक्षा महागाई आणि बांधकाम क्षेत्राने घेतलेल्या ...

सातारा : आयुष्यात प्रत्येकाला आपलं स्वत:चं हक्काच घर असावं, असं वाटतं. मात्र, ही अपेक्षा महागाई आणि बांधकाम क्षेत्राने घेतलेल्या भरारीमुळे बहुदा फोल ठरत असते. अशा निराधार कुटुंबांना शोधून जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हक्काचा निवारा करून दिला आहे. वर्षानुवर्षे माती कुडाच्या घरात राहणाºयांनी जेव्हा उंबºयातून पहिलं पाऊल आत टाकलं, तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले. याचे साक्षीदार बरेच अधिकारी आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील आणि निराधार लोकांना घरकुल दिलं जातं. मात्र, त्यासाठी कादपत्रांची पूर्तता करावी लागते. शासनाकडून लाभार्थ्याला दीड लाख रुपये घरकुलसाठी मंजूर केले जातात. त्यामध्ये घरासाठी १ लाख २० हजार, रोजगार हमी योजनेतून घराचे काम पूर्ण करण्यासाठी १८ हजार २७० रुपये आणि शौचालयासाठी १२ हजार असे एकूण दीड लाख रुपये अनुदान मिळते. त्यामुळे लाभार्थ्यांकडून मागणीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षी सुमारे १५ हजार लोकांनी अर्ज सादर केले होते. परंतु त्यामध्ये अनेकजण निकषामध्ये बसत नव्हते. काहींनी स्वत:चे घर असतानाही शासनाकडून लाभ घेण्याचा प्रयत्न केला, अशा कुटुंबांचे प्रस्ताव फेटाळून लावण्यात आले. सध्या जिल्ह्यात ७ हजार ८१६ घरकुल बांधून पूर्ण झाले आहेत. उर्वरित २५० घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत दहा हजार घरांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचा मानस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाºयांनी केला आहे. याची दखलही राज्यपातळीवर घेतली गेली आहे.घरकुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर काही लाभार्थ्यांनी घराच्या वास्तुशांतीदिवशी अधिकाºयांना निमंत्रित केले होते. त्यावेळचा माहोल पाहून आजही अधिकाºयांची मने हेलावून जात आहेत. काहींनी घराचं स्वप्न पाहणेच बंद केलं होतं. उंबºयातून पहिलं पाऊल टाकताच काहीजण अक्षरश: घायमोकलून रडल्याचे अधिकाºयांनी पाहिले. सध्याच्या महागाईत १५० लाखांचं अनुदान कमीच वाटतं. परंतु हा हातभार लाख मोलाचा असल्याचं फलटण येथील सदाशिव माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.घरांसाठी झेडपीची जागा...अनेकांना घर बांधण्यासाठी जागाच नाही. अशा ७५ लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा मिळण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. काहीजणांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण कायम करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. ज्या लोकांनी अतिक्रमण केले आहे, याची यादी तयार करण्यात आली आहे. लवकरच या लोकांना शासकीय जागा हस्तांतरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.